Total Pageviews

Monday, 16 November 2015

शिवछत्रपती व दुर्गबांधणी भाग : १

शिवछत्रपती व दुर्गबांधणी भाग : १

"थोरले महाराज ( शिवाजी महाराज ) पुंडावे करीत असेत समई.... चुलते आर्जाजी यादव व हिरोजी फर्जंन हे दोघे इमारतीचे हवालदार यांजजवळ अठरा हजार माणूस इमारतीचे. येकाचे नऊ हजार व येकाचे नऊ हजार. येकून अठरा हजार. " ....यादव दप्तरा ( सन १६९८ दरम्यान )
"बादशहाला ( औरंगजेब ) जगात काय कमी आहे."
"पण किल्ले जिंकून घेण्याचा काय विलक्षण लोभ त्याला आहे. दगड धोंड्याच्या त्या ढिगार्यांसाठी ( किल्ल्यांसाठी ) तो पहा कसा रानोमाळ भटकत आहे."
"बादशहाच्या डोक्यात किल्ले जिंकून घेण्याचे वेड शिरले आहे."
वरील उद् गार आहेत मोगल तोफखान्याचा हिशोब तपासनीस भीमसेन सक्सेना याचे जो औरंगजेबा बरोबर दक्षिण मोहिमेत हजर होता. औरंगजेबाला वेड लागले होतेच, ते वेड होते हिंदवी स्वराज्य बुडविण्याचे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले आणि संभाजी महाराजांनी  " आता हे हिन्दुराज्य जाहले "
असा जगाच्या पाठीवर एकमेव शिलालेख ( हडकोण-फोंडाजवळ गोवा ) कोरून ठेवला. औरंगजेबाला हे कसे सहन होईल. आणि हिंदुंचे राज्य उभे होते ते या गडकोटावर. राज्य संपवायचे तर हे गडकोट घेतले पाहिजेत. स्वराज्याचे संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग हे औरंगजेबाने देखील जाणले होते.

शिवरायांनी म्हटले होतेच, "दिल्लिंद्रासारखा ( औरंगजेब ) शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने तीनशेसाठ किल्ले हाजरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशेसाठ वर्ष पाहिजेत. "सह्याद्रीतील या गड-कोटांपुढे औरंगजेबाला हार मानावी लागली. अखेर या ठिकाणीच औरंगाबाद ( संभाजीनगर ) येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू बरोबर प्रचंड मोगल साम्राज्याच्या विनाशाला वेगाने सुरूवात झाली आणि थोड्याच वर्षांनी अटकेवर शेकडो वर्षा नंतर मराठ्यांनी भगवा झेंडा फडकला.

No comments:

Post a Comment