सरसेनापती हंबीरराव मोहिते –
भाग ५
भाग ५
अनेक लढाया
पुढे मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्याबरोबरच्या नाशिकजवळच्या रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले (जुलै १६८२). त्यानंतर मोघल सरदार कुलीच खानबरोबर भीमा नदीच्या परिसरात लढाई(ऑक्टोबर १६८२). शहजादा आज्ज्म बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई (१५ डिसेंबर १६८२ व जाने-फेब्रु १६८३)
मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई (२७ फेब्रुवारी १६८३ ) शाहबुद्दीन बरोबर रायगडच्या परिसरात लढाई (जानेवारी १६८५) . मोघली मुलखात चढाया सन १६८६) ,अश्या अनेक लढाया केल्या. या अश्या पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदारशी झाली (डिसेंबर १६८७). उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जखानच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली. पण लढाईच्या काळात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले . अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली. ऐन धामधुमीच्या काळात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला .
मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई (२७ फेब्रुवारी १६८३ ) शाहबुद्दीन बरोबर रायगडच्या परिसरात लढाई (जानेवारी १६८५) . मोघली मुलखात चढाया सन १६८६) ,अश्या अनेक लढाया केल्या. या अश्या पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदारशी झाली (डिसेंबर १६८७). उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जखानच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली. पण लढाईच्या काळात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले . अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली. ऐन धामधुमीच्या काळात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला .
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment