Total Pageviews

Wednesday, 2 September 2015

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... ! भाग २


छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग २
स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोड़णे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते. या शिवाय 'माणूस ख़राब होवू नये' याची ते नेहमीच दक्षता घेत. ह्याचमधून निर्माण झाले मराठ्यांचे एक विलक्षण युद्धतंत्र. अफझलखान मोहिम असो नाहीतर पुरंदरची लढाई प्रकर्षाने हेच पुढे येते. माणूस ख़राब होवू नये म्हणजे सैन्य जाया होवू नये म्हणुन त्यांनी पुरंदरची लढाई थांबवून तह स्वीकारला.

फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,
"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."
राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment